Tuesday 5 April 2011

पूनम का चांद

पूनम पांडे.. बस नाम ही काफी है!.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं!!! या बयेमुळं पहिला झटका ऑस्ट्रेलियाला बसला... दुसरा सर्वश्रुत पाकिस्तानला बसला... काय कोण जाणे पण आफ्रीदी आणि कंपनीला वाटलं की त्यांचे भारतीय मित्र त्यांना त्या पूनमच्या पार्टीत येऊ देतील म्हणून भारताला जिंकून देण्याचे अगाढ प्रयत्न केले, कॅचेस सोडल्या आणि भारताला फायनलला पोचवून दिलं...
आफ्रीदीला खूप आशा होत्या की, त्याला पूनम दिसेल... त्याभरातच त्याने पाकीस्तानाच्या स्वभावाविरोधी टिप्पणी दिली की 
आपण भारताशी वैर वगैरे का करतो.. ब्ला ब्ला.. तसेच भारताला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या... मात्र आपल्याला ह्यातलं काहीच दिसणार नाही हे समजताच तो पेटला आणि लगेच म्हणाला 'भारतीय कोत्या मनाचे आहेत'.. बिचार्‍याच्या शब्दांचा आपण विपर्यास करत आहोत.. त्याला 'अमन की आशा' द्वारे भारतात बोलवा आणि पूनमशी भेट घालून द्या म्हणजे त्याचा गैरसमज दूर होईल ;)
इथं फायनलला सचिन, सेहवाग सारख्या पत्नीव्रतांना हे पाप वाटत होतं त्यामुळं आपल्या विकेट श्रीलंकेला बहाल करून त्यांनी आपल्या पवित्र चारीत्र्याची पावतीच दिली.. पण लग्न न झालेला गौतम गंभीर पूनमला पाहण्याबाबत भलताच गंभीर वाटत होता.. त्यात त्याला साथ भेटली ती नव्या दमाच्या विराट कोहलीची.. जेनेलीया सोबत फास्टट्रॅक करूनही त्याला पूनम का चांद पहायची तीव्र इच्छा होत होती.. ;) पण दीलशानला विराटची ही कोवळी इच्छा पाहवली नाही.. अर्थात त्याला हे आपल्याला मिळणार नाही हे पुरतं माहिती होतं म्हणून त्याने विराटचा झेल पकडला..आणि हिरमुसल्या मनाने विराट तंबूत परतला... विराटचा तो हिरमुसलेला चेहरा पाहून कप्तान धोणीला कीव येणं साहजिक होतं.. नवं लग्न झालेलं असूनही केवळ मित्रांखातर त्याने श्रीलंकेचा बॅंड वाजवला... शतकाच्या उंबरठ्यावर असताना गौतम गंभीर अति उतावळा झाला आणि लगेच तंबूत परतला...बहुदा युवराजने त्याला चूकीची बातमी दिली की पूनम आता तंबूत आहे... मग काय धोणीने विजयी षटकार मारल्या मारल्या हळूवार आठवणींमुळे आणि पुढील नयनरम्य स्वप्नांमुळे युवराजला आनंदाचे अश्रू थोपवता आले नाही...आणि तो हमसून हमसून रडू लागला...आता धसकीने पूनम हॉस्पीटल मध्ये आहे ;)