Thursday 7 January 2010

बंद, तोड्फोड आणि सामान्य माणुस

वेगळ्या तेलंगाना राज्याच्या मागणीमुळे आंध्र प्रदेशात गेल्या एक महीन्यापासुन अस्थीरतेचे वातावरण आहे.
या काळात तब्बल पाच वेळा बंद पुकारण्यात आला, आणि ठिक-ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले.
तेलंगाना आणि आंध्रा भागात अनेक बसेस तोडल्या, फोडल्या गेल्या, बर्याच जाळल्या गेल्या, या सर्वाची परिणीती म्हणजे बस सेवांच्या दरात झालेली वाढ.
ती ही साधारण नाही तर २५%, म्हणजे काही राजकीय पक्षाच्या स्वार्थी हेतुपायी सामान्य जनतेलाच हाल सोसावे लागणार आहेत.
बंदच्या काळात बसेस, लोकल रेल्वे सेवा नसल्यामुळे आधीच जास्तीचा खर्च ट्रांसपोर्टेशन वर खर्च करुन, न केलेल्या चुकांबद्दल त्याच्याकडुन वसुली होत आहे.
बंद्च्या या दुष्टचक्रातुन लोकं कधी शिकणार आहेत?, राजकीय बंद ला सपोर्ट देण्यापुर्वी विचार आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment